Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्याला आरोग्यसंपन्न आयुष्याचा निरोगी श्वास देणारी ही सृष्टी आता दृष्टीआड करून चालणार नाही. त्यामुळेच जेंव्हा आपण होलिका दहनाचा विचार करतो तेंव्हा त्यासाठी वृक्षतोड होणार नाही, निसर्गरंगांची जपणूक होईल, याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. पर्यावरणपूरक होळीचं आयोजन आणि नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदाची धुळवड साजरी करूया, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Exit mobile version