Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ‘क्लायमेट चेंज २.० – मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. इतिहासात काय घडलं, यापेक्षा भविष्यात ते घडू नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कोविडनं माणसाला एकमेकांची मदत करणं शिकविलं, त्याचप्रमाणे वातावरणीय बदल ही आपत्कालीन परिस्थिती असून यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. मुंबई फर्स्ट च्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित या परिषदेत, मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर, युरोपीय संघाचे राजदूत उगो अस्तुतो, आणि जागतिक पातळीवरचे पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते.

Exit mobile version