Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्राला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार – माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी देशातील आर्थिक स्थिती आणि राज्यातील मुद्दांवरून भाजपचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर टीका केली आहे.

राज्याला आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी मुंबईत प्रमुख व्यावसायिक तसंच पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यात अनेक अशा समस्या आहेत की ज्या कृत्रिम आहेत, असंही डॉ. मनमोहन सिंग यावेळी म्हणाले.

Exit mobile version