Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात आतापर्यंत २२ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी घेतली खबरदारीची लसमात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ७७५ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९३ लाख ८७ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

Exit mobile version