Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

नवी दिल्ली : आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मोहीम, किसान सन्मान योजना यांसारख्या केंद्र सरकारच्या लोक कल्याणकारी योजनांचे लाभ लोकांना मिळत आहेत असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. इराणी यांनी काल उत्तरप्रदेशातल्या अमेठी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला भेट दिली.

त्यावेळी एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. आपल्या एका दिवसाच्या अमेठी भेटीत इराणी यांनी अमेठीतल्या जगदीशपूर इथं त्यांनी गांधी संकल्प पदयात्रे सोबतच्या मोटारींच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवला, जगदीशपूर इथं त्यांनी वृक्षारोपणही केलं, तसंच लखनऊ – वाराणसी मार्गावरच्या निहालगढ रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीमेतही त्या सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version