Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल या विषयावर समग्र चर्चेसाठी एक्सप्रेस वृत्तसमूहातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भविष्यात इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन यासारख्या पर्यायी इंधनाची मागणी वाढणार आहे.नागरिकांची ही गरज लक्षात घेता, साखर कारखान्यांनी साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन यासारख्या उत्पादनांवर अधिक भर दिला पाहिजे असंही  गडकरी  यावेळी म्हणाले.

Exit mobile version