Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही – काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता ही लोकहितासाठी राबवायला हवी. मात्र जर का सत्ता विरोधकांना संपवण्यासाठी राबवली तर जनता त्यांना थारा देत नाही, हेच विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झालं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पक्षांतर करून भाजपात गेलेल्यांनाही जनतेनं योग्य तो धडा दिला असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करून काही संस्थांनी मतदानोत्तर कलच चाचणीचे निकाल दाखवले होते, त्यांना जनतेनं खोटं ठरवलं असंही वडेट्टीवार म्हणाले.

जनतेनं दिलेला कौल मान्य करून भाजपानं सत्तेपासून दूर राहायला हवं असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचे आभारही मानले.

Exit mobile version