सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची इच्छा असणाऱ्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मंत्रालय विविध संबंधित यंत्रणाशी समन्वय साधत आहे. भारतीय वायु दलाची दोन सी-130 जे ही विमानं आपत्कालीन व्यवस्थेसाठी जेदाह मध्ये तैनात आहेत तर INS सुमेधा सुदानच्या बंदरावर भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचलं आहे. अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.