Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधारथ या फिरत्या शिधावाटप दुकानांमार्फत धान्यांचं वितरण केलं जाणार आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाईल. शिधा वाटप दुकानाच्या प्राधिकार पत्र मंजुरीचे अधिकार शिधा वाटप नियंत्रक आणि नागरी पुरवठा विभागाच्या संचालकांना दिले आहेत.

Exit mobile version