Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक-यांना कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

विमाकंपन्या योग्य प्रकारे कार्यवाही करत नसल्याचं आपल्याला आढळून आल्याचं ते म्हणाले. सरकारनं विमा कंपन्यांबरोबर बैठक घेऊन शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात अशी मागणी पवार यांनी केली.

Exit mobile version