Site icon साप्ताहिक एकच ध्येय

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. ‘चौकीदार चोर है’ या गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.

परंतु त्या प्रकरणी गांधी यांनी दाखल केलेला माफीचा अर्ज न्यायालयानं स्विकारल्यानं राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती के.एम. जोसेफ यांच्या पीठानं हा आज हा निर्णय दिला.

Exit mobile version