Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेत  बोलत होते.

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. केंद्र सरकारनं तातडीनं आर्थिक मदत करावी. यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषी मंत्री आणि अर्थ मंत्री यांच्याशी चर्चा करु असंही ते म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता नाही. पाच वर्ष सरकार चालेल याकडे आमचं लक्ष राहील. महिला मुख्यमंत्री झाल्या तर आनंद होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान शेतकरी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्या दुपारी तीन वाजता राज्यपालांनी भेटीची वेळ दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली.

Exit mobile version