Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्ली स्तरावर निर्णय होतील असंही त्यांनी सांगितलं.

अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांनी राज्यापालांची भेट घ्यायला उशीर केला. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसनं आधीच राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली. सध्या दोन्ही पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी शेताच्या बांधावर नुकसानीचा आढावा घेत आहेत असं ते म्हणाले.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीबाबत “तीन अंकी नाटक” असा खिल्लीवजा उल्लेख भाजपा करत आहे. मात्र त्यांना या तीन अंकी नाटकाचा शेवट माहीत नाही असा टोला थोरात यांनी लगावला.

Exit mobile version