Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही ; इथं आमचाच मुख्यमंत्री होईल असा भाजपाचा विश्वास

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाला वगळून सरकार स्थापन होऊ शकतं नाही. इथं भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीनं व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत हे मत व्यक्त केलं. भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

राज्यात कडबोळं सरकार टिकणार नाही असं ते म्हणाले. १०५ आमदारांसह भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकांचा पक्ष आहे. १४ आमदारांच्या पाठीब्यांवर आमची संख्या ११९ आहे. सर्वच पातळ्यांवर पक्षाची कामगिरी  सरस आहे, असं त्यांनी सांगितलं. भाजपाच्या या बैठकांमधे विधानसभा निवडणूकीचं विश्लेषण, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह इतर मुद्यांवर चर्चा झाली. भाजपाची संघटनात्मक रचना तयार होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Exit mobile version