Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं एक डाव आणि १३० धावांनी जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला सामना भारतानं जिंकला.  इंदूर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं पहिल्या डावात ३४३ धावांची आघाडी घेतली होती.

मात्र दुसऱ्या डावातही बांगलादेशाचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत, आणि त्यांचा डावडाव २१३ धावांतच आटोपला.  भारतानं एक डाव १३० धावांनी बांगलादेशला हरवलं.

Exit mobile version