Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जम्मू काश्मीरमध्ये विनाकारण गोळीबार करत पाकिस्तानकडून पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात विनाकारण गोळीबार करत पाकिस्ताननं काल पुन्हा शास्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला भारतीय  जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

रात्री साडेआठ वाजता पाकिस्ताननं बालाकोट परिसरात नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला.

रात्री सव्वा नऊ पर्यंत दोन्हीकडून गोळीबार सुरूच होता, या गोळीबारात भारताची कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही,  संरक्षण प्रवक्त्यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली.

Exit mobile version