Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा ६७ धावांनी पराभव केला आणि ही मालिका २-१ अशी जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित वीस षटकात तीन बाद २४० धावा केल्या होत्या. के एल राहुलच्या ९१ , रोहित शर्माच्या ७१ आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती नाबाद ७० धावांच्या जोरावर भारतानं ही कामगिरी केली.

या विशाल धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाला आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. येत्या रविवारपासून दोन्ही संघादरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होत आहे.

Exit mobile version