Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : आपलं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते शिवरायाचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सभेत बोलत होते.

हे राज्य गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी तसंच महिलांचं आहे, त्यामुळे त्याचा कारभार चालवताना आपण शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. याआधी ठाकरेंनी सहकुटुंब लोणावळ्याला एकवीरा देवीचं दर्शन घेतलं.

Exit mobile version