Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना राज्यात शांतता राखण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी राज्यात शांतता राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यांनी विधानसभेत याबाबतचं निवेदन केलं.

राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी सरकार समर्थ असल्याचं ते म्हणाले. या कायद्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज आहेत, तसंच काही लोक नागरिकांमधे संभ्रम पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना बळी पडू नका, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version