Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कटक इथं सुरु असलेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी ३१६ धावांचं आव्हान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कटक इथं भारत आणि वेस्ट इंडिजमधे सुरु असलेल्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतासमोर विजयासाठी ५० षटकात ३१६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजच्या ४ बाद १४४ धावा झाल्या असताना निकोलस पूरन आणि किरॉन पोलार्डनं पाचव्या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारी करत विंडीजची स्थिती मजबूत केली.

भारतातर्फे नवदीप सैनीनं २ तर शार्दूल ठाकूर, शमी आणि जडेजानं प्रत्येकी १ गडी बाद केला.भारत आणि वेस्ट इंडिजनं तीन सामन्यांच्या या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी आजच्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे.

Exit mobile version