Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस आणि इतर सहयोगी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी केला आहे.

ते रांची इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या कायद्याबद्दल कोणत्याही भारतीय नागरिकांनी भिती बाळगू नये, असंही ते म्हणाले. विरोधकांकडून होणार्‍या अपप्रचाराला जनतेनं बळी पडू नये, केवळ बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान च्या पीडित अल्पसंख्यांकांना न्याय देण्यासाठी केंद्रानं हा कायदा केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version