Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत याच वर्षी चांद्रयान-तीन मोहिमेला आरंभ करेल, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना दिली.

चांद्रयान-दोन मोहिमेचा अनुभव गाठिशी असल्यानं तसंच आवश्यक पायाभूत सेवा- सुविधाही उपलब्ध असल्यानं, या मोहिमेचा खर्च तुलनेनं कमी असेल, असं ते म्हणाले. चंद्राच्या पृष्ठभूमीवर यान उतरवण्याचा, चांद्रयान दोन हा भारताचा पहिलाचा प्रयत्न होता.

Exit mobile version