Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून शिवसेनेनं जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत ते पालघर इथं बोलत होते. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेनं महाविकास आघाडीच्या सरकारला फसवणुकीबद्दल, मतदानातून  चोख  प्रत्युत्तर द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

या नव्या सरकारनं शेतकऱ्यांची सुद्धा फसवणूक केली आहे अशी टीकाही फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली.

Exit mobile version