Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडियामध्ये कुणीही सुरक्षिततेबाबत काळजी करण्याचं कारण नाही, अशी ग्वाही खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे.

या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोशी आणि संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए अँगामुथू यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं, की स्पर्धेच्या काळात कडेकोट त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे.

यंदा ही स्पर्धा येत्या दहा तारखेपासून गुवाहाटी इथं सुरु होत आहे. स्थानिक लोकांचा चांगला पाठिंबा मिळत असून, सहभागाविषयी कुणीही कसली शंका बाळगण्याचं कारण नाही, असं या अधिका-यांनी सांगितलं.

Exit mobile version