Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नवी दिल्ली : स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक विहित नमुन्यातील प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली या कार्यालयास पाठवू शकतात.

राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्:मय निर्मितीसाठी ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजना’ राबविण्यात येते. प्रकाशन वर्ष 2019 च्या पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांकडून 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’ या सदरात ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2019 नियमावली व प्रवेशिका’  शीर्षाखाली व ‘Whats New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -२०१९ Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात या स्पर्धेच्या प्रवेशिका व नियमपुस्तिका विनामूल्य उपलब्ध आहेत.

दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका ‘महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली’ या कार्यालयास पाठवू शकतात. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई -400025 या पत्त्यावरही थेट प्रवेशिका पाठविता येतील. लेखक, प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत असे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version