Site icon साप्ताहिक एकच ध्येय

“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमात देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमा दरम्यान प्रधानमंत्री मोदी काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, परीक्षांमुळे येणारा ताण कसा दूर करावा याबद्दल विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतील, तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही देतील.

Exit mobile version