Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस – ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासाठी तयार केल्या जाणार्‍या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे सुपूर्द केली जातील अशी माहिती या मोहिमेचे रशियाचे उप प्रमुख रोमन बाबुश्किन यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.

याशिवाय सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक्त निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल, असं ते म्हणाले. रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह राइफली देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

एस ४०० हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली जगातल्या सर्वोत्तम यंत्रणेपैकी एक आहे, यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होईल असं बाबुश्किन म्हणाले. भारत आणि रशिया यांच्या २०१८ मध्ये यासंबंधीचा पाच अब्ज डॉलर्स चा करार झाला होता.

Exit mobile version