मुंबई : पारशी नूतन वर्षानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पारशी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देश आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात पारशी समाजाचे योगदान मोठे असून विशेषतः सामाजिक बांधिलकी जोपासताना विविध सेवाभावी उपक्रमांत या समूहाचा पुढाकार निश्चितच आदर्शवत आहे. संत झरथुष्ट्र यांच्या शिकवणुकीनुसार उच्च जीवनमूल्यांची जपणूक करताना सर्व समाजघटकांच्या हितासाठी त्यांनी काम केले आहे. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावताना राष्ट्रभावनेचीही जोपासना केली आहे. नवभारत घडविण्याच्या नव्या संकल्पनेत पारशी बांधव अधिक योगदान देत राहतील, असा विश्वास वाटतो.