मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार १२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ३६ हजार २२० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६१ लाख २४ हजार २७८ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३३ हजार ५३० रुग्ण दगावले.‌ सध्या राज्यात ७४ हजार ९९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ६६ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.