नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत.

यातल्या हेमंत बारी यांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलं आहे. तर विनय बिंद हा ३० टक्के भाजला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून ४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आहेत. आणि अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

मात्र केमिकल प्लांट असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याऐवजी फाम चा आधार घेतला जात आहे. बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या प्लॉट नंबर टी – १०१ हर्षल केमिकल प्रा .लि या कंपनीत आज संध्याकाळी जवळपास ६ वाजताच्या दरम्यान स्फोट होऊन भीषण आग लागली.