मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या जालना आणि बदनापूर तालुक्यातून जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात ४२ किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गावर १ हजार ३१० कोटी ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत ४३७ कोटी ३० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता दिवाकर मोरे यांनी दिली आहे.