मुंबई : सांगली-कोल्हापूर परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी कुर्ला पश्चिम येथील (कुर्लेकर) रहिवाशांनी मदतफेरी काढली होती. त्यामध्ये जमा झालेले अन्न धान्य, कपडे बाधित नागरिकांना पाठविण्यात आले. तर जमा झालेल्या रोख १.५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कुर्ला पश्चिम येथील रहिवासी मनोज नाथानी, राजा साळवी, किशोर सोनावणे, किरण सुर्वे, मधुकर धस, महेंद्र सांगळे आदी कुर्लेकर रहिवाशांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला होता.