मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला 100 दिवस पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विधानभवन येथे झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्ष आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली असून यामध्ये विविध मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विभागांनी 100 दिवसांत घेतलेल्या निवडक निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.