नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकांसाठी राज्यातील सातही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. सातपैकी तीन जागांवर भाजप, दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर शिवसेना आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आली आहे.

भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, छत्रपती उदयनराजे भोसले आणि भागवत कराड यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

तर राष्ट्रवादीकडून अध्य शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेवर गेले आहेत. शिवसेनेकडून प्रियंका चर्तुवेदी तर काँग्रेसकडून राजीव सातव बिनविरोध निवडले गेले आहेत.