नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेनं आज 20 मार्च ते 31 मार्च या कालावधीत लांबपल्ल्याच्या आणखी 84 रेल्वेगाडया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्तापर्यंत रेल्वेनं 155 रेल्वेगाड्यांची वाहतूक रद्द केली आहे. या गाड्यांमधे आरक्षण केलेल्या प्रवाशांना वैयक्तीक पातळीवर माहिती दिली जात असून त्यांच्याकडून कोणतंही शुल्क न आकारता तिकीटाची संपूर्ण रक्कम त्यांना परत केली जाईल, असं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

त्याशिवाय खानपान सेवा विभागातल्या कर्मचा-यांची आरोग्यविषयक चाचणी करुनच त्यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी सूचना रेल्वेनं सर्व मुख्यालयांना केली आहे.