नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारखान्यातल्या किंवा आस्थापनेतल्या कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाली तर संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. समाज माध्यमांवरुन अशा प्रकारची माहिती प्रसृत होत असल्यानं हा खुलासा केला आहे.

फॉरवर्ड केलं जाणारं पत्रक हे अन्य राज्यातल्या औद्योगिक आस्थापनांच्या बैठकीचा वृत्तांत  असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते. पण ते महाराष्ट्रातलं असल्याचे भासवून गैरसमज पसरवला जात आहे. मुळात तसा प्रस्तावही शासनाच्या विचाराधीनसुद्धा नाही, असं राज्य शासनाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे.