नवी दिल्ली : चालू वर्षाखेरीस भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान चार कसोटी सामने तसंच तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात आज माहिती दिली. यातली टी 20 सामन्यांची मालिका ऑक्टोबर महिन्यात खेळली जाणार आहे.

भारतीय संघ 3 डिसेंबर पासून चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियात दाखल होईल. यानंतर लगेचच 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाईल. मात्र या कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी संचालक केविन रॉबर्ट्स यांनी वर्तवली आहे.