नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट असून, राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या या चित्रफितींबाबत लष्करानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर निर्माण झालेला तणाव संवादाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही देश करत असून, माध्यमांनी या प्रक्रियेत बाधा येईल अशी कुठलीही गोष्ट प्रसारित करू नये, असं आवाहन भारतीय  लष्करानं केलं आहे.