नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात टाळेबंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात तासभर चर्चा झाली. केंद्र सरकारनं टाळेबंदीत वाढ केल्यानंतर राज्यात त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची, कोणत्या गोष्टी सुरु करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात प्रतिबंधित क्षेत्र कोणते ते ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज प्रशासनातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय टाळेबंदी उठवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल.