मुंबई : राज्यात दि. 1 ते 31 जुलै पर्यंत 878 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 30 लाख 3 हजार 474 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात   30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये  30 लाख 3 हजार 474 आणि  असे एकूण  दि.  1 एप्रिल  ते  31 जुलै या कालावधीत 1 कोटी  19 लाख 83 हजार 3 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.