मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारवर कामगार विरोधी धोरणाचा आरोप करत विविध कामगार संघटनांच्या वतीने आज नाशिक येथे निदर्शने करण्यात आली. असंघटित कामगारांना मदत निधी द्यावा, कोरोनामुळे रोजगार बुडल्याने गरिबांना प्रत्येकी दहा किलो धान्य द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.