मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सात हजार ३०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख दहा हजार ३५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याच प्रमाण ८९ पूर्णांक ९९ शतांश टक्के झालं आहे.

काल दिवसभरात आणखी पाच हजार ५४८ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख ७८ हजार ४०६ झाली आहे. राज्यभरात काल ७४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ९११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातला मृत्यूदर २ पूर्णांक ६२ शतांश टक्के एवढा आहे. सध्या एक लाख २३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.