मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३९ रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ८४ हजार १२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ७९ शतांश टक्के झालं आहे.

काल २ हजार ९१० नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८७ हजार ६७८ झाली आहे.

सध्या राज्यभरात ५१ हजार ९६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ५२ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला.

राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३८८ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.