मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधींजींनी सत्य, अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्काचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचे कल्याण आहे ही त्यांची शिकवण होती. खेडी स्वयंपूर्ण झाली तरच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार आहे. हा विचार अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधींजींच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाची  एकता, अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले.