मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने माण तालुक्यातील दहिवडी इथं आजपासून पुढे तीन दिवस उस्फुर्त टाळेबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. या टाळेबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.