नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान योद्धा महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. महाराणा प्रताप यांनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि शौर्याने भारत मातेचा गौरव केला असून महाराणा प्रताप यांचा मातृभूमीप्रती केलेला त्याग कायम स्मरणात राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.

थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांना मोदी यांनी जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. गोखले यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेत समर्पित केले आणि ते सर्वांसाठी चिरंतन प्रेरणास्थान राहतील असं सांगत मोदी यांनी विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनाही जयंतीनिमित्त अभिवादन केलं असून टागोर यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यास बळ आणि प्रेरणा प्रत्येकाला मिळत राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.