मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या गृह विभागाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर येत्या २१ जुलै रोजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे.