मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. राज्यपालांनी रागगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामधल्या तळिये गावाला भेट देऊन त्यांनी दरड दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली तसंच बाधितांचं सांत्वनही केलं. बाधितांना अधिकाधिक मदत मिळवी यासाठी स्वतः प्रयत्न करु असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार मिळून दूर्घटनाग्रस्त आणि बाधितांचं लवकरात लवकर पुनर्वसन करतील, तसंच अधिकाधिक सुविधाही पुरवतील अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलं.