मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या ७ हजार १३० रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ डिसेंबरला मतमोजणी होईल,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली काल दिली. या निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ७ डिसेंबर रोजी पडताळणी होईल, तर ९ डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेतले जातील. राज्यभरात ११३ नगरपंचायतींमधल्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील असंही यू.पी.एस.मदान यांनी सांगितलं.