नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-२० क्रिकेट मालिकेतला पहिला सामना काल भारतानं ६ गडी राखून जिंकला. कोलकता इथं झालेल्या सामन्यात भारताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजनं भारतासमोर विजयासाठी १५८ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रतिउत्तरादाखल भारतानं १८ षटकं आणि ४ चेंडूत १६२ धावा केल्या. रोहित शर्मानं १९ चेंडूत ४० धावा केल्या तर, इशान किशननं ३५ धावा केल्या.